वनविभागाचा जिओ कंपनीवर मायेचा हात. . . .

 वनविभागाचा जिओ कंपनीवर मायेचा हात. . . . 

 प्रतिनिधी : अजय लहारे    

विक्रमगड:-वनविभागाचा जिओ कंपनीवर मायेचा हात असल्याचे दिसुन येते,गरिब-गरजु भुमीहीन शेतकरी (पलाटधारक) वनविभागाकडे स्वत:च्या पलाटामध्ये स्वत:चा व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्याकरिता गेल्या कित्येक वर्षापासुन झाडे सफाई व सपाटीकरण करुन लागवडीसाठी परवानगी मागतात. तरि सुद्धा वनविभाग गरजु पलाटधारकांना परवानगी देत नाही, परंतु जिओ कंपनीवर वनविभागाची जास्तच माया असल्याचे दिसुन येते.जिओ कंपनीला एकरेषीय प्रकल्पांबाबत झाडे तोडण्यास व कामे सुरु करणेसाठी परवानगी देण्यात आली आहे.

        मे.रिलायन्स जिओ इन्फॉकॉम लिमिटेड नागपुर यांना तालुका-जव्हार,विक्रमगड व वाडा जि.पालघर मधील राज्यमहामार्ग क्रमांक-३०, ३४अ,७७ व प्रमुख जिल्हामहामार्ग २१,जव्हार-साकुर-पोचाडे-वाडा च्या कडेने वनविभागाच्या जमिनित भुमीगत ऑप्टिकल फायबर केबल लाईन खोदण्यास वनविभागाने परवानगी दिलेली आहे.परंतु एखादा गरजु पलाटधारक त्याच्या स्वत:च्या वनपट्यात उदरनिर्वाहासाठी झाडे-झुडपे तोडण्यास व सफाई करण्यास परवानगी मागतोय तर त्याला परवानगी न देता,उलट त्याला शासनाच्या कायद्याची जाणीव करुन दिली जाते व शासनाच्या कायद्याचा धाक दाखवला जातो. 

        गरिब-गरजु माणुस इंटरनेटने उदरनिर्वाह करु शकतो की,आपल्या वनपलाटात जमिन कसुन आपल्या परिवाराचं पोट भरुन सुखी राहु शकतो? वनविभागाची अश्या मोठ्या प्रकल्पांना त्वरित परवानगी दिली जाते. आणि गरिब-गरजु लोकांना का परवानगी दिली जात नाही? गरजु लोकांवरतीच शासनाचा कायदा चालतो का?डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना समान हक्क अधिकार दिलेले आहेत,तरि सुद्धा सामान्य माणसांवरती अन्याय होत असल्याचे दिसुन येते.





          

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या