फुटपाथच्या कामातून पैसे खाणाऱ्या, त्यासाठी रस्ते उकरणाऱ्या लोकांना आपण देशाचे आणि राज्याचे आयडॉल करून बसलोय ...

 प्रतिनिधी : योगोश अल्हाट

फुटपाथच्या कामातून पैसे खाणाऱ्या, त्यासाठी रस्ते उकरणाऱ्या लोकांना आपण देशाचे आणि राज्याचे आयडॉल करून बसलोय ... मग असेच तरुण मरणार ! Upsc Mpsc करणारे मरणार शेतकरी मरणार कलाकार मरणार लेखक मरणार काल एक कला दिग्दर्शक मेला . जे जे संवेदनशील , सर्जनशील आहेत , ते सगळे मरणार आणि फक्त राजकारणाशी संबधीत लोक जिवंत राहणार अशी खंत सिने दिग्दर्शक आणि लेखक प्रविण तरडे यांनी व्यक्त केली .

प्रविण तरडे म्हणाले  ' हा पक्ष त्या पक्षाशी युती करणार या पक्षाचा नेता त्या पक्षाला जाऊन भेटला , अशा दररोज चर्चा सुरु आहेत या सगळ्यांसाठी वेळ आहे आणि येथे तरुण पोरे मरतायेत , यांना देण्या साठी वेळ नाहीये का ?  12 -13 आमदाराच्या नियुक्त्या होण्यासाठी दररोज राज्यपालांकडे जात आहेत  आणि  ह्याना वेळ नाहीये ... दिल्लीत हेच चालू आहे , महाराष्ट्रात हेच चालू आहे , सगळ्या भारतात हेच चालू आहे , मग राजकारण्यांनीच जगायचं का? असा रोख ठोक सवाल तरडे यांनी केला .

राजकारणी यांच्या बद्दल काही बोलायल जावं तर  ट्रोल करतात . ट्रोल करणाऱ्याना  हे माहित नाही का ? एक दिवस आपल्याच घरातील कोणीतरी मरणार आहे .  ह्या देशात आणि राज्यात सुखी फक्त हेच (राजकारणी ) लोक जिवंत राहणार आहेत अशी खंत प्रवीण तरडे यांनी व्यक्त केली . 

' आभ्यास करूण आणि आईबापांचे स्वप्न पाहून  तुम्ही इथ पर्यंत आला आहात  , कुठल्या तरी फालतू सिस्टिम साठी स्वतःचा अमुल्य जीव वाया घालवू नका , संयम ठेवा आणि प्रशासकिय सेवेत जाऊन यांना उघडं पाडा असं आवाहन प्रविण तरडे यांनी यावेळी केले .



टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. संपूर्ण देशात प्रत्येक राज्यात हीच परिस्थितीती असुन त्याला आपण वाचा फोडून जनमासात जागरूकता करत आहात.पण आपली जनता कधी सुधारणार.आज देशाला एक क्रांतिकारक विचार देण्याची गरज आहे आणि आपण कामाला सुरुवात केली आहे.
    अशा सकारात्मक विचारांसाठी आपणास शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा