मंत्री छगन भुजबळ यांनी संवैधानिक शपथेची पायमल्ली (उल्लंघन)केल्या मुळे त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यांनी मंत्री व विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा देण्याची सकल मराठा समाजाची मागणी
चाळीसगाव प्रतिनिधी
मराठा योध्दा आदरणीय मनोज जरांगे-पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील मराठा समाजाला कुणबी मराठा आरक्षण मिळावे म्हणून आपल्या जिवाची पर्वा न करता जिवाचीबाजी लावून आमरण उपोषण केले.आणि आरक्षणावर मार्ग काढण्यासाठी सरकारने त्यांच्या कडे दोन महिन्यांचा कालावधी मागून घेतला. त्यामुळे जरांगे-पाटील यांनी सरकारचा मान राखून आमरण उपोषण मागे घेतले. आणि साखळी उपोषण सुरू ठेवावे असे मराठा समाजाला जाहीर आवाहन केलेले आहे. त्यामुळे बहुतेक ठिकाणी आजही साखळी उपोषण सुरू आहे.तरी अशा कठीण परिस्थितीत मंत्री छगन भुजबळ साहेब यांची एक आॅडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ही कथीत क्लिप अनेक इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या माध्यमातून प्रसारित झालेली आहे.छगन भुजबळ हे या क्लिप मध्ये संभाषण करताना आपल्या एका कार्यकर्त्याशी बोलताना म्हणाले की त्यांचे बुलडोझर सुरू झाले.आता सर्वाना उभे रहावे लागेल,तो कार्यकर्ता म्हणतो की साहेब आम्ही आपल्या पाठीशी ते एक,एक करून ओबीसी मध्ये घुसताय भुजबळांना तो म्हणतो की साहेब आपण निर्णय घ्या आम्ही तुमच्या बरोबर आहे. भुजबळ म्हणतात मी आता उभा रहातोय करेंगे या मरेंगे अशी भाषा वापरली आहे. तरी एका संवैधानिक पदावर असणारा आमदार,मंत्री अशी हिंसेची भाषा वापरून एक प्रकारे भुजबळ साहेब हे दोन समाजात सामाजिक भेद आणि तेढ निर्माण करून समाजात अशांतता पसरविण्याचे काम जाणीव पूर्वक करित आहेत.
तरी आदरणीय राज्यपाल यांनी छगन भुजबळ यांना संविधानीक शपथ देताना आणि शपथ घेताना बोललेले असते की मी समाजात कोणत्याही प्रकारचे जातीभेद करणार नाही.किंवा कोणाशी वैरभावाने वागणार अथवा वावरणार नाही.मग भुजबळ साहेब असे मराठा समाजा बद्दल कसे काय? व्यक्ती द्वेषाने वागु शकतात भुजबळांनी विधानसभा सदस्य व मंत्रीपदाच्या वेळी घेतलेल्या संवैधानिक शपथेची पायमल्ली(उल्लंघन) केल्याचा गुन्हा दाखल व्हावा व त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा.अशी मागणी आज दि.७ नोव्हेंबर २०२३ रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने चाळीसगाव तहसिलदार व शहर पोलीस निरीक्षक यांच्या मार्फत लेखी निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्या कडे मागणी केलेली आहे. निवेदनावर गणेश पवार,प्रशांत गायकवाड,खुशाल पाटील, मनोज भोसले,सुनिल चव्हाण,साहेबराव काळे, बाजीराव दौंड,भिकन निकुंभ,दिलीप पाटील शिवाजी पाटील, राजेंद्र पाटील,रणधिंर जाधव,सागर चौधरी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

0 टिप्पण्या