वर्षाची सुरुवात आशीर्वाद आणि कौतुकाने करताना मला खरोखरच भाग्यवान वाटत आहे.
रेनबो फाउंडेशन ट्रस्टच्या कार्याला २०२५ चा प्रतिष्ठित समाज भूषण पुरस्कार देऊन मान्यता दिल्याबद्दल मी आनंद निधान (आनंद निधान), दीपाली भाटकर, समीर भाटकर आणि मालाड कोळी समाज यांचे मनापासून आभार आणि आभार मानतो.
हा सन्मान केवळ माझ्यासाठी नाही तर या प्रवासाचा भाग असलेल्या प्रत्येकासाठी आहे. मी मॅजिक बस फाउंडेशनच्या शिक्षकांचे आणि अजय सरांचे मनापासून आभार मानू इच्छितो ज्यांनी माझ्यात आजच्या व्यक्तीमध्ये घडवणारी मूल्ये रुजवली.
आम्ही शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात शांतपणे प्रभावी काम करण्यावर विश्वास ठेवतो. आमचे ध्येय हास्य पसरवणे आणि मुले सुरक्षित आणि काळजी घेत आहेत याची खात्री करणे आहे.
येणारे वर्ष अधिक अर्थपूर्ण काम आणि अधिक सकारात्मक बदल घेऊन येवो. या प्रवासात आम्हाला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचे आभार!
लांजा
कोकणातील अनेक ग्रामीण भागातील शाळातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळवून देणाऱ्या रेम्बो फाउंडेशन मुंबई या संस्थेचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांना मालाड कोळी समाज संस्था या संस्थेच्या वतीने समाजभूषण पुरस्कार देऊन नुकतेच गौरव करण्यात आले
सदरचा पुरस्कार वितरण समारंभ शनिवार दि. २५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता मालाड कोळी समाज सस्था सभागृह येथे संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार केणी यांच्या उपस्थितीत व आनंद निनाद संस्थेचे अध्यक्ष संजय सावंत यांच्या हस्ते श्री प्रकाश चव्हाण यांना समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रकाश चव्हाण यांनी रेनबो फाउंडेशनच्या माध्यमातून मुंबई, रत्नागिरी, हैदराबाद, कर्नाटक आदी विविध भागात विद्यार्थ्यांसाठी विशेष काम करताना त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व आर्थिक सहाय्य मिळवून देताना त्यांचा शैक्षणिक दर्जा व गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले आहे तसेच त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात नवनवीन प्रयोग व खेळ यांची निर्मिती केली असून ग्रामीण भागातील तसेच अत्यंत गरीब कुटुंबातील व झोपडपट्टी वस्तीतील मुलांना आनंदीदायी शिक्षण मिळावे यासाठी त्यांचे विशेष प्रयत्न असतात या प्रयत्नामुळेच व कामाची दखल घेऊन त्यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
.................................जाहिरात....................................
0 टिप्पण्या